शिराळा, दि.21 जुलै 2023 (महाराष्ट्र मराठी न्यूज वृत्तसेवा – नथुराम कुंभार ) कवयित्री मनीषा पाटील-हरोलीकर यांच्या ‘नाती वांझ होताना” या कवितासंग्रहास नुकतेच दोन पुरस्कार जाहीर झाले. पाहिला पुरस्कार सोलापूर जिल्ह्यातील महाराष्ट्र साहित्य परिषद, दामाजीनगर शाखेचा मातोश्री लक्ष्मीबाई भास्कर जोशी स्मृती पुरस्कार हा जाहीर झाला आहे. परिषदेचे अध्यक्ष प्रकाश जडे यांनी या पुरस्काराची घोषणा केली. डाॕ.दत्ता सरगर यांच्या अध्यक्षतेखाली रेखा जडे, भारती धनवे, प्रा.विश्वनाथ ढेपे व सचिन गालफांडे या तज्ञ निवड समितीने ‘नाती वांझ होताना’ या कवितासंग्रहाची उत्कृष्ठ कवितासंग्रह म्हणून निवड केली. मानचिन्ह व रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. तर दुसरा पुरस्कार नायगाव जिल्ह्यातील जिल्हा नांदेड येथील प्रतिष्ठेचा ‘केवळबाई मिरेवाड साहित्य हा पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार कै. केवळबाई मिरेवाड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जातो. संयोजक वीरभद्र मिरेवाड यांनी या पुरस्काराची घोषणा केली आहे. डाॕ.अशोक कौतिक कोळी व पांडुरंग पुठ्ठेवाड या तज्ञ कमिटीने या पुरस्कारांची निवड केली. रोख रक्कम ,सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असुन दोन्ही पुरस्कार समारंभपुर्वक प्रदान करण्यात येणार आहेत. या यशाबद्दल कवयत्री मनिषा पाटील यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
